औरंगाबाद : पुरोगामी महाराष्ट्राचे धिंडवडे काढणारी घटना त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्यात कसे बारा वाजले आहेत हे दाखवणारी घटना आज औरंगाबाद शहरात घडली आहे. ह्या जातीयवादाच्या अमानुष कृत्यामुळे आज महाराष्ट्र अक्षरशः हादरला आहे.
औरंगाबाद शहरातील मनोज आव्हाड या गरीब दलित तरुणाचा काही लोकांनी जातीय मानसिकतेतुन अत्यंत क्रुर पध्दतीने मारहाण करून खुन केला आहे. ह्या घटनेमुळे दलित समाजात असंतोषाची लाट पसरली आहे.
काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक रवींद्र दळवी यांनी ट्विट करून ह्या घटनेची माहिती दिली असून आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा झाली पाहिजे व पीडित कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे. अशी मागणी केली आहे.
औरंगाबाद येथील मनोज आव्हाड या गरीब दलित तरुणाचा काही लोकांनी जातीय मानसिकतेतुन अत्यंत क्रुर पध्दतीने मारहाण करून खुन केला आहे.आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा झाली पाहिजे व पीडित कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे@OfficeofUT @Dwalsepatil @satejp @bb_thorat @NANA_PATOLE @NitinRaut_INC pic.twitter.com/37XPf6WqKy
— Ravindra Dalvi (@Dalvi_INC) April 22, 2022