मुंबई- दुष्काळग्रस्त १५ जिल्ह्यांतील तरुण-तरुणींसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ ४,२४२ चालक-वाहक पदांची भरती करणार आहे. भरतीत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी दिली. ही भरती औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांत होईल.








