महाराष्ट्रात पुन्हा जातीयवाद उफाळला; नांदेड जिल्ह्यात बौद्ध तरुणाची निर्घृण हत्त्या..

349

Nanded : फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा जातीयवाद उफाळून आला आहे. गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली याचा राग धरून एका बौद्ध तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.

नांदेड जिल्ह्यातील बांडोरा हवेली गावात बौध्द तरुण अक्षय भालेराव या तरुणाचे निर्घृण भोसकून हत्याकांड झाले आहे. चार ते पाच जणांनी एकट्याला गाठून हा हल्ला केला असल्याची माहिती मिळत आहे.

बांडोरा हवेली या गावात इतिहासात पहिल्यांदा भीमजयंती साजरी करण्यात आली होती. भिमजयती  साजरी करण्यासाठी अक्षयने पुढाकार घेतला होता. याच गोष्टीचा राग येथील जातीयवादी गावगुंडांना होता. यातूनच हे हत्याकांड घडले असल्याचा आरोप ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी केला आहे.

राज्य सरकारने व पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेवून आरोपींना अटक करावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिपक केदार यांनी दिला आहे.