स्वांतंत्र मिळाल्यापासून आजपर्यंत रस्ता बनलाच नाही; दिपक चंदनशिवे यांनी घेतली थेट नितीन गडकरींची भेट….

333

नागपूर : भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील मौजे शंकरगांव ते नळी या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण झालेच नाही. हीच बाब आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य संघटक सचिव दिपक चंदनशिवे आणि केशव ठाकरे, प्राचार्य डॉ. सुभाष कदम, बंडू बाबर यांनी देशाचे भूतल परिवहन राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.

या रस्त्याच्या कामासाठी अंदाजे ५ कोटीचा निधी तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नितीन गडकरी यांनी संबंधितांना तातडीने लक्ष घालण्याचे आदेश यावेळी दिले आहेतं.