भीमा कोरेगांव विजय स्तंभला अभिवादनसाठी लाखोंचा निळा जनसागर; शांततेत आणि उत्साहात सोहळा पार पडला…

240

Pune : १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरातील आंबेडकर अनुयायी येत असतात. २०५ व्या विजयदिनी विविध पक्ष , संघटना , व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून लाखो आंबेडकर अनुयायी आज भीमा कोरेगाव येथे दाखल झाले होते. त्यामुळे विजयस्तंभ परिसरात निळा सागर लोटल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते.

यावेळी विविध पक्ष, सामाजीक संघटनांच्या यांच्यावतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले होते. भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली होती. इंग्रजांच्या सैन्यात महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा पाडाव केला होता. पराक्रमाची शर्थ करून महार सैनिकांनी विजय मिळविला होता. या शहीद झालेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ येथे भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. १९२७ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह विविध राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.

विजय स्तंभला मानवंदना देण्यासाठी काल मध्यरात्रीपासुनच मोठ्याप्रमाणावर गर्दी करण्यात आली होती. विविध पक्ष, संघटनांच्या वतीने येथे रॅली काढीत विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. मानवंदनेसाठी आज आलेल्या प्रमुख मान्यवरात केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले , मंत्री दिपक केसरकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भीम आर्मिचे चंद्रशेखर आजाद , पीपल्स रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन सेना दलित कोब्रा, बहुजन समाज पार्टी, भीमशक्ती, सामाजिक विकास संघटना, बहुजन सुरक्षा गट, झोपडपट्टी सुरक्षा दल,भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ, बुद्दिष्ट मुव्हमेंट सेंटर ट्रस्ट, फुले-शाहू आंबेडकर विचार मंच, भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती आदींसह बार्टि व विविध संस्था व पदाधिर्कायांचा समावेश होता.

कोरेगाव भीमा व पेरणे ग्रामपंचायतीच्या वतीने फिरते शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचे कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे व पेरनेच्या सरपंच उषा दशरथ वाळके यांनी सांगितले. यावेळी मानवंदना देण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांचे सर्जेराव वाघमारे व त्यांचे सहकारी उपस्थितांचे स्वागत करत दिवसभर ध्वनीक्षेपकावर नियोजन करण्यात येत होते.

यावेळी पोलीसांचे चोख बंदोबस्त व नियोजनामुळे विजयस्तंभ अभिवादन सोहळा पार पडला आहे. पुणे व नगर बाजुकडुन येणा-या बांधवांसाठी तसेच व्हिआयपींना येण्याजाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका केल्यामुळे विजयस्तंभ प्रवेशद्वाराजवळ गर्दी झाली नाही. अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख व जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल , उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे , यांच्यासह बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये , समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे , बांधकाम विभागाचे मिलींद बारभाई यांनी योग्य समन्वय साधत सर्व आरोग्य , पाणी , वाहतुक यांचे योग्य नियोजन केले होते.

वाहतुक कोंडी होवू नये, यासाठी पुणे-नगर रस्त्यावर चारही बाजूंनी येणारी वाहतूक पयार्यी मागार्ने वळविण्यात आली होती. तसेच अंतर्गत वाहतुकीसाठी सुमारे ३६० बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.

ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या गदीर्चे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्वाची आणि मोलाची कामगिरी बजावली आहे.