औरंगाबाद मध्ये १६ मजुरांचा मालगाडी खाली चिरडून मृत्यू…

536

शुक्रवारी पहाटे एक मोठी भीषण व वेदनादायक दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद येथील बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.

जालन्यातील एका कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते.

सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून मृत्यू झाला.

करमाड पोलीस निरीक्षक खेतमालस अधिक तपास करीत असून या अपघातातून वाचलेल्या तीन कामगारांकडून मयताची ओळख पटवीत आहेत. सर्व मयत व्यक्तींचे मृतदेह घाटी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आलेले आहेत. या दुर्घटनेत मरण पावलेले कामगार मध्यप्रदेशातील सादोल आणि उमरिया जिल्ह्यातील रहिवासी होते हे मजूर चंदनझिरा, जालना भागातील एसआरजे या स्टील कंपनीत कामाला होते