मोदी-शहा या दोघांनी सोनिया गांधींना केले “गोगलगाय” : प्रकाश आंबेडकर

412

औरंगाबाद: नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी सोनिया गांधींची गोगलगाय करून टाकली आहे, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलत होते. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सोनिया गांधी यांची गोगलगाय करून टाकली आहे. या दोघांनी काँग्रेस पक्ष संपवून टाकला आहे. त्यामुळे आपल्याला अस्तित्वाची लढाई स्वत:च लढावी लागणार आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी NPR, CAA, NRC या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. नरेंद्र मोदी या देशात जन्माला आले म्हणून त्यांना देशाचे नागरिकत्व दिले जाते. मात्र, तुमच्याकडे जन्माचा दाखला नसेल तर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आई-वडील किंवा आजोबांचा जन्माचा दाखला दाखवावा लागणार आहे. मग आम्हालाच वेगळा न्याय का लावला जातो, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.