Earthquake in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात भुकंपाचे धक्के…

289

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात भुकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड मोठी घबराट पसरली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा अशी घटना घडली असल्याने नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरीतीली साखरपा, संगमेश्वर आणि देवरुख परिसरात हे धक्के जाणवले आहेत. या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. रात्री दीड वाजता विविध ठिकाणी हे धक्के जाणवू लागले होते.

राष्ट्रीय भुकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भुकंपाचे धक्के साखरपा, संगमेश्वर आणि देवरुख येथे जाणवले. चार रिश्टर स्केल ऐवढी भुकंपाच्या धक्क्यांची तीव्रता होती. मुंबईहून जवळ 350 किमी दूर भुंकपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणतेही आर्थिक नुकसान ही झाले नाही. भुकंपाच्या या घटनेबद्दल अधिक माहिती मिळवण्याचे काम  केले जात आहे. स्थानिक प्रशासनाद्वारे ही माहिती दिली गेली आहे.