…अन्यथा मंत्र्यांना दूग्धाभिषेक! राजू शेट्टींचा सलग दुसऱ्या दिवशीही सरकारवर हल्लाबोल…

321

उस्मानाबाद : दुधदरवाढीच्या मागणीवरून शेतकरी संघटना नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्य सरकारमधील मंत्री स्वतःची तिजोरी भरण्यासाठीच निर्णय घेत असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

सरकारनं दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात प्रतिलिटर थेट 5 रुपये अनुदान जमा केलं नाही तर सरकारमधील मंत्र्यांना दूग्धाभिषेक घालणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दूधदरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी आणि जनावरांसह उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम शहरात उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.