महाराष्ट्रात रोजच्या रोज करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज ४४० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे.
एकूण रुग्णसंख्या ८०६८ झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही दिली आहे. आज राज्यात १९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १९ पैकी १२ मृत्यू मुंबईत, पुण्यात ३, जळगावात २, सोलापूरमध्ये १ आणि लातूरमध्ये १ मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ११८८ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.,.