“वारसांच्या वादात पडून आम्हाला पॉलिटीकल स्कोर करायचा नाही”

388

मुंबई : “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकावरुन सध्या प्रचंड मोठा वाद सुरु आहे. या पुस्तकावरुन राजकीय नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांमध्ये अप्रत्यक्षपणे वाद सुरु झालाय. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या वादात पडणार नसल्याचं सांगितलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांच्या वादात आम्हाला पडायचं नाही. राजकीय पक्षांच्या भांडणात पडून आम्हाला पॉलिटीकल स्कोर वाढवायचा नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ‘जाणता राजा’ ही पदवी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना लोकांनी दिलेली पदवी आहे. रयतेचा राजा म्हणून लोकांनी मानलेले आहे, तेच आम्हाला महत्वाचं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.