वंचितने आपला गड राखला, भाजपला बसला मोठा फटका…

664

अकोला : गेल्या 20 वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या वंचितने यावेळी सुद्धा आपला गड राखण्यात यश मिळवलं आहे. तर जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.

अकोल्यात अनेक बोलणी करून सुद्धा महाविकास आघाडी स्थापन होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि वंचित हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे ही निवडणूक लढले. भाजपच्या केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र भाजपला या निवडणुकीत जोरदार फटका बसला आहे. या निवडणुकीत 6 जागांवर समाधान मानावं लागलं. प्रकाश आंबेडकरांना गड राखण्यास यश मिळालं आहे.