पश्चिम महाराष्ट्र पुरात… मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉफ्टरनं केली पाहणी.

868

सांगली : जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात बोट उलटून १० जण ठार झाले आहेत. नऊ जणांचे मृतदेह सापडले असून आणखी तीन जण बुडाल्याची शक्यता आहे. तर इतरही तीन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आलीय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर, सांगलीमध्ये हवाई पाहणी केली. यावेळी सांगली शहर आणि आसपासची परिस्थिती अतिशय भीषण आहे. जिल्ह्याला सगळीकडे पाण्याने वेढले आहे. तसेच, खराब हवामानामुळे सांगलीचा दौरा रद्द करावा लागला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.