काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार, चार आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले राजीनामे.

453

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत, तर अनेक नेते प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 4 आमदार राजीनामे दिलेत.

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी सगळ्यात आधी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास राजीनामा दिला. त्यानंतर अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, मुंबईतील वडाळाचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर राजीनामा देण्यासाठी विधान भवनात आले. याशिवाय नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईकांनी सुद्ध विधानभवन गाठले.

नुकतेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड आणि संदीप नाईक हे सुद्धा पक्ष सोडणार असल्याने, या धक्क्यांमध्ये वाढ होत आहे.