… आणि रामदास आठवले म्हणाले, “ये रे, ये रे पावसा”

1211

औसा : शिवसेना-भाजपा युतीच्या प्रचारासाठी औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित महायुतीची सभा पार पडली. या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर केली. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण रक्त आटवल्याचे सांगत आपल्या भाषणात धम्माल उडवून दिली.

रामदास आठवले म्हणाले,
“येरे येरे पावसा मतांच्या पावसा
शृंगारेंना निडणून देणार आहे लातूरचं औसा
म्हणूनच पाहूत शृंगारेेंच्या नौसा
आणि ओमराजेंना निवडून आण्यासाठी
येरे येरे लवकर पावसा
आज या ठिकाणी आपली महायुतीची अत्यंत प्रचंड अशापद्धतीची सभा
भीम शक्तीची सभा
भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आणि रासप आणि आमच्या महायुतीची जाहीर सभा
तुम्हाला मी दिली आहे फार मोठी मुभा
म्हणूनच नरेंद्र मोदींची एवढी मोठी या ठिकाणी सभा
आज याठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा आले आहेत
म्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आपले वाद मिटवले
कारण, त्यांच्यामध्ये होते रामदास आठवले
अरे तुम्हाला एकत्र आण्यासाठी मी माझं रक्त आटवले
म्हणून शृंगारे आणि रामराजेंना पार्लमेंटमध्ये पाठवले
आम्ही लोकांच्यासाठी काम करणारे लोक
फक्त आरोप करणारी आमची भूमिका नाही
विरोधकांनी जे काय करावं, पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो आहोत.
बाबासाहेब आंबेडरांनी ज्या संविधानतला भारत उभारण्याचा आमचा सरकार प्रयत्न आहे
एनडीएचं सरकार आहे, ते भूल थाफा देणारं नाही…”