चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना निलंग्यातील जवानाला वीरमरण…

368

लातूर – भारत-चीन या दोन देशात सीमाप्रश्नावरून डोकलाम परिसरात तणाव आहे. याच परिसरात कर्तव्य बजावीत असताना नागनाथ अभंग लोभे (वय ३५ ) या जवानाला वीरमरण आले. ते लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील उमरगा (हा) गावाचे रहिवाशी होते. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. ह्या भागात सद्या बर्फवृष्टी सुरु आहे. सियाचीन परिसरात नागनाथ लोभे व त्यांचे इतर चार सहकारी हे वाहनातून गस्त घालत होते. रस्त्यावर बर्फ पसरल्याने, निसरडी वाटेमुळे त्यांचे गाडीवरिल नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत कोसळली. यामध्ये पाचही जवानांना वीरमरण आले आहे.

यात निलंगा तालुक्यातील उमरगा (हा) या छोट्याश्या गावातून गेलेले नागनाथ यांचा समावेश आहे. नवनाथ मागील अनेक वर्षांपासून देशाची सेवा करीत होते. नियमीतपणे या सीमावर्ती भागात गस्त घालत असताना ही दुर्घटना घडली.

नागनाथ यांचे पार्थिव उमरगा या त्यांच्या मूळगावी आणले जाणार आहे. मात्र ते कधीपर्यंत येईल, हे अद्यापही अधिकृत सांगण्यात आलेले नाही. उमरगा गावात ही बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. नवनाथ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, 15 दिवसांपूर्वीच निलंगा तालुक्यातीलच एक जवानाला वीरमरण आले होते.