मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्त्वाची व कठोर पावले उचलली आहे. राज्यातही सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दरम्यान, राज्यात कोरोंनो बाधितांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची महत्त्वपूर्ण माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शुक्रवारपर्यंत राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ होती. परंतु शनिवारी ती ६३ वर पोहोचली आहे. एका दिवसात राज्यात करोनाचे ११ रूग्ण वाढले आहेत. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आलेले रूग्ण आहेत. तर ३ जणांना संसर्गामुळे कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.