राफेल प्रकरण; देशाची सुरक्षाव्यवस्थाच धोक्यात: प्रकाश आंबेडकर

609

लातूर : राफेल प्रश्नावर भाजप आणि काँग्रेसची भूमिका भूमिका आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने रिलायन्स कंपनीच्या अनिल अंबानींच्यानादी लागून राफेल विमानांची खरेदी केली, आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजवले. असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी लातूर मधील पत्रकार परिषदेत केला आहे.

राफेल विमान खरेदी करत असताना अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक होते. राफेलची विमान ‘रेडी टू युज’ मध्ये राहतील याची कसलीच गॅरेंटी नाही. त्यामुळे युद्धकाळात राफेलच्या विमानांमध्ये बिघाड झाल्यास किंवा काही स्पेअर पार्टची गरज लागल्यास ती कोण उपलब्ध करणार, हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. जर युद्ध काळात असा प्रसंग आल्यास ३६ हजार कोटींची राफेलची विमाने ही निरुपयोगी ठरतील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.