जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिल्याबद्दल भारतीय महिलांच्या कंपाऊंड टीमचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

194

बर्लिन येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल भारतीय महिलांच्या कंपाउंड टीमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“आमच्या कंपाऊंड महिला संघाने बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले असून हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्या विजेत्यांचे अभिनंदन ! त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण यामुळे हे अभूतपूर्व यश मिळाले आहे .”